January 7, 2011

काही तोडगे -उपाय

आजारीपण-

एखादे वेळी घरातील व्यक्ती फार आजारी होते. औषध पाण्याचा काहीच गुण येत नाही व त्याच्या जीविताबद्दल काळजी वाटू लागते. अशावेळी करावयाचा तोडगा-सकाळी स्नान झाल्यावर देवासमोर बसुन २७ वेळेला गायत्री मंत्राचा जप करावा. नंतर एक पाट पुढे मांडून त्यावर दुधाने पाऊण भरलेला पेला ठेवावा व त्यावर हात ठेवून ओम चैतन्य अश्विनी कुमाराय नम:... या मंत्राचा १०८ जप करुन
ते दुध आजारी माणसास पिण्यास द्यावे . असे ७ दिवस करावे.

----------------------------------------------------------------------------------------

मुलीचा विवाह -


मुलीने आपल्या पत्रीकेत ज्यावेळी वृषभ राशीत चंद्र येईल त्या दिवसापासून तो कर्क राशीत येईपर्यंतच्या काळात " श्री लक्ष्मीनारायणाय नम:" या मंत्राचा रोज स्नानानंतर १०८ वेळा जप करावा . जप काळात कांदा व लसूण खाऊ नये व परगावी
जाऊ नये. जपकाळातील मंगळवारी एकभुक्त रहावे.रोज रात्री ज़ोपण्यापुर्वी आईला अगर घरातील सुवासिनीला नमस्कार करावा. लाजू नये

संदर्भ - श्रीभविष्य दर्शन मासिक - मे १९७३

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या